जालना- जालना हे मराठवाड्यातच नव्हे तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत पोहोचलेलं नाव आहे. पूर्वी जालन्याला एक खेडं म्हणून संबोधले जायचं परंतु आता याच जालन्याला विविध चळवळींचे उगमस्थान किंवा आंदोलनाचा जिल्हा म्हणून ओळखायला सुरुवात झाली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी झालेले आंदोलन आणि त्यानंतर आता जालना- नांदेड या समृद्धी महामार्गासाठी उद्या मंगळवार दिनांक 28 पासून बळीराजाचे होत असलेले धरणे आंदोलन.
जालना तालुक्यातील देवमूर्ती ,रामनगर ,राममूर्ती, पानशेंद्रा या भागातील शेती ही जालना -नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे. त्यापैकी सुमारे 100 एकर शेती ही देव मूर्ती शिवारातील आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांना नोटीसही गेल्या आहेत. शेवटी हे विकास काम असल्यामुळे शासनापुढे कोणाचेही चालणार नाही ,परंतु योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन द्यायची तरी कशी? आणि शासनाच्या दबावा पुढे झुकून ही जमीन दिली तर पुढे काय? या जमिनीच्या आलेल्या मोबदल्यामध्ये जमीन मिळत नाही .समजा आता चार एकर जमीन या महामार्गासाठी गेली तर शासन जेवढा मोबदला देईल तेवढ्या मोबदल्यामध्ये एक एकर जमीन सुद्धा या परिसरात मिळणार नाही. त्यामुळे त्यामुळे पैसा घेऊन करायचं काय म्हणूनच शेतकऱ्यांनी आता दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी याच भागातील गोशाळा चालक दिलीप राठी यांनी शासनाला पाच फेब्रुवारी 2025 रोजी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. या इशाराचा परिणाम आता हळूहळू परिसरात दिसायला लागला आहे आणि शेतकरी देखील आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत .त्याचाच एक भाग म्हणून आज काही शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार मूल्य प्रमाणे संपादित केलेल्या शेतीचा मोबदला द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यासोबत दिलीप राठी यांनी आत्मदहनाच्या दिलेला इशारा पाठिंबा देऊन आम्ही देखील आत्मदहन करू, असे सांगून त्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्याच सोबत उद्या मंगळवार दिनांक 28 पासून देवमूर्ती शिवारातील ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे या शेतकऱ्यांसह रामनगर आणि पानशेंद्रा भागातील शेतकरी देवमूर्ती परिसरात मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू करत आहेत .त्यामुळे आता हे प्रकरण हळूहळू पेटायला लागलं आहे. मागणी एकच आहे, नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गाला जो भाव दिला किंवा जालना तालुक्यातील खरपुडी येथे होत असलेल्या सिडको प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींना जो भाव दिला तोच भाव जालना -नांदेड या समृद्धी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीला द्यावा. आज जे शेतकरी एकत्र आले होते त्यामध्ये.दिलीप शिवलाल राठी,संतोष भगवानराव कदम ,राजेश उत्तमराव कदम,गिरधारी भाऊराव म्हस्के,प्रकाश धोंडीबा म्हस्के,मधुकर धोंडीबा म्हस्के,रामनाथ रंगनाथ कदम,प्रल्हाद रंगनाथ कदम,महेंद्र रामेश्वर कदम,पांडुरंग बाबूराव कदम,संजय बाबूराव कदम,ज्ञानेश्वर रामेश्वर कदम,बळीराम कदम,सचिन आत्माराम खरात,प्रकाश कारभारी फुलझाड़े,जुम्मा घोचीवाले यांचा समावेश होता.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा. आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता . -दिलीप पोहनेरकर-9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com