आयोध्या- उत्तर प्रदेश मध्ये सध्या प्रयागराज येथे महा कुंभ मेळाव्याची धूम चालू आहे. देशाचे नव्हे तर जगभराचे या कुंभमेळ्याकडे लक्ष लागलेले आहे .असे असताना सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते परंतु प्रसिद्धी माध्यम आणि इतर माध्यमांच्या माध्यमातून या कुंभमेळ्याची प्रसिद्धी झाली आणि प्रत्येक भाविकाला आपण प्रयागराज मध्ये येऊन एकदा तरी स्नान करावे अशी इच्छा निर्माण झाली. त्यामुळेच की काय देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून अनेक वाहने भरभरून प्रयागराज कडे निघाले .दिनांक 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा मेळावासुरू राहणार आहे. जशी -जशी हवा पसरत गेली तशी तशी इथे गर्दी वाढत गेली आणि प्रशासनासमोर या सर्व भाविकांच्या व्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला.
आयोध्या- कुंभमेळा झाल्यानंतर याच राज्यात असलेल्या श्रीराम जन्मभूमी आयोध्याकडे जाण्यासाठी पोलीस मुख्य रस्त्यावर अटकाव करत आहेत. परंतु अयोध्येपासून 30 कि.मी. वरील हे गाव राम भक्तांसाठी जटायू आणि शबरीचे काम करत आहे. आणि राम भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीने आयोध्याकडे रवाना करत आहेत .
सुविधा जरी मिळत नसल्या तरी भाविकांचा लोंढा मात्र कमी झाला नाही .त्यासोबत याच राज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या काशी विश्वेश्वराचे एक मंदिर आहे आणि हिंदू धर्माची अस्मिता प्रभू श्रीराम यांचे जन्म ठिकाण म्हणजे आयोध्या आहे या आयोध्याच्या नूतन मंदिराला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भाविकाला इतक्या दूर आल्यानंतर प्रयागराज काशी विश्वेश्वर आणि राम ललाचे जन्म ठिकाण अयोध्या हे पाहावेच वाटते त्यामुळे प्रयागराज केल्यानंतर हे भाविक काशी विश्वेशराकडून किंवा प्रयागराज वरून थेट अयोध्येला जाण्याचा प्रयत्न असतात दरम्यानच्या काळात भाविकांची वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ठीक ठिकाणी व्यवस्थेच्या कामामुळे काही निर्बंध लादले आहेत त्यापैकीच आयोध्या मध्ये येणाऱ्या भाविकांना अनेक ठिकाणी अडवले जात आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना परतही पाठविले जात आहे. आयोध्या मध्ये येणाऱ्या अनेक रस्त्यांवर पोलीस भाविकांच्या वाहनांना दुसरीकडे वळवत आहेत अशाच ठिकाणी जसे राम भक्तांसाठी जटायू आणि शबरी हे दोघेजण मार्गदर्शक ठरले होते तसेच याच जिल्ह्यातील एका गावातील नागरिक हे मार्गदर्शक ठरले आहेत पोलिसांनी ज्या ठिकाणी वाहने अडवली त्याच्या बाजूनेच काही ग्रामस्थ या वाहनांना ग्रामीण भागातून वाट काढून देत आहेत ग्रामीण भाग असल्यामुळे निश्चितच रस्त्यांची दुरावस्था आणि अरुंद रस्ते आहेत यामध्येही भाविक उत्साहाने अपनी वाहने वाहने काढत आहेत साहजिकच आढवळणाची ही रस्ते असल्यामुळे त्यांच्या वाहनांना देखभाल दुरुस्ती तसेच त्यांच्या चहापान आणि भोजन व्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे परंतु या सर्वांवर मात करत एक गाव असे हे आहे की ज्या गावाने राम भक्तांच्या वाहनांसाठी मार्गदर्शक फलक बनवले आहे ज्या रस्त्यावरून ही वाहने सुरक्षित आयोध्याकडे रवाना केली जात आहेत तालुका बिकापूर गाव भदू नारायण
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172