जालना- स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही, ज्यांना कोणाला भेटायला यायचे असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावे असा त्यांचा दरारा होता. परंतु मुख्यमंत्री म्हणून स्वतःच्या चेहरा दाखविण्यासाठी उद्धव ठाकरे हे चिल्लर लोकांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. सत्तेच्या मोहापाई त्यांनी सर्व नीतिमत्ता सोडली आहे, बाळासाहेबांचा एकही गुण त्यांच्यामध्ये नाही आणि उद्धव ठाकरेची शिवसेना ही शंभर टक्के सेक्युलर झाली आहे. मी आत्तापर्यंत नऊ निवडणुका लढविल्या आणि त्या सर्व धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढविल्या आहेत त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणण्याचा या ठाकरेंना अधिकार नाही .परंतु सत्तेसाठी ते काँग्रेसच्या चिल्लर लोकांना भेटत आहेत अशी टीका भारत सरकारच्या आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.
शिंदे सेनेचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी खासदार प्रतापराव जाधव ,खासदार संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आणि वकप बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात खासदार जाधव बोलत होते. यावेळी मान्यवरांची समायोजित भाषणेही झाली. कार्यक्रमाची भूमिका माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या प्रस्तावनेत विशद केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172