जालना-वर्षानुवर्ष कॉपी साठी प्रसिद्ध असलेल्या सेवली येथील परीक्षा केंद्रात आता परीक्षार्थ्यांची हींम्मत वाढली आहे, आणि यावर्षी शासनाने कॉपीमुक्त धोरण अवलंबिले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीला आळा ही बसला आहे, परंतु केवळ परीक्षेत पास होण्यासाठी जालना तालुक्यातील सेवली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतल्या जातो .
कॉपी बहाद्दरांचं सेंटर म्हणून जिल्ह्यात सर्व दूर माहीत आहे. जालना जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणजे हे सेवली गाव आहे. त्यामुळे विकासापासून तर वंचित आहेत पण अशा अनाधिकृत कामांसाठी देखील ते प्रसिद्ध आहे. मतदानाच्या काळातही हे गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत या गावातील परीक्षा केंद्रांवर मुक्तपणे कॉप्या पुरविल्या जायच्या . परंतु आता हा प्रकार बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड चिडले आहेत, तसा तर या शाळेचा भव्य दिव्य आवार, तीनही बाजूने वर्ग खोल्या आहेत. त्यामुळे संरक्षण भिंतीवरून खोलीमधील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणे सहज शक्य होत आहे .परंतु प्रशासनाच्या धोरणामुळे कॉपी पुरवणाऱ्यांना आळा घालण्यात येत आहे .या प्रकाराला चिडून काल दिनांक 8 रोजी सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या पालकांनी कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला परंतु पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला. तसेच कर्मचारी- अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली किंवा कॉपी करू नाही दिली तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत .या संदर्भातील एक लेखी तक्रार केंद्रप्रमुख बी.बी.पवार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे .त्याचसोबत वाढीव पोलीस बंद देण्याची मागणी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अशा पालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही केली आहे. वाढीव पोलीस बंदोबस्त न मिळाल्यास कर्मचारी काम करण्यासाठी धजावत नसल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com