जालना- जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करू हा जालनेकरांना दिलेला शब्द आपण पूर्ण केला आहे. हा शब्द पूर्ण करत असताना केवळ शासनच आपल्या मदतीला होते आणि मी एकटा होतो. असे असताना अनेकांनी अपप्रचार केला. खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेने ते साफ नाकारले. त्यामुळे विरोध करणारे हे दूध खुळे, नादान आणि अल्लड आहेत, त्यामुळे त्यांचा हेतू तपासण्याची गरज आहे एवढेच नव्हे तर जायकवाडी जालना पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनी संदर्भात तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर आणि आपण पाठपुरावा केला होता .त्यामुळेच आज जालन्याला एवढं पाणी मिळत आहे आणि त्याही पुढे जाऊन काल पालकमंत्री अतुल सावे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि जालनाच्या आमदारांनी जरी अंबडला पाणी देण्याचा ठराव केला असला तरी आताच्या परिस्थितीत जेवढे पाणी दिल्या जाते तेवढेच दिल्या जाईल, त्यापेक्षा जास्त पाणी अंबडला देण्यासाठी आपला विरोध आहे असेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या वेळी काल जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांना शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेरावा घालून निधी वाटपाचा जाब विचारला होता आणि घोषणाबाजी ही केली होती. यासंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांनी खुलासा करून आपण संबंधित पक्षाला विकासासाठी 14 कोटी रुपये दिले असल्याचे म्हटले आहे परंतु आपल्याला फक्त सात कोटी मिळाले आहेत. आणि पालकमंत्र्यांनी 14 कोटी दिल्याचा दावा केला आहे हे खोटे आहे पालकमंत्र्यांनी जर 14 कोटी दिल्याचे सिद्ध केले तर आपण वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहोत असे आव्हानच माजी मंत्री खोतकर यांनी पालकमंत्री अतुल सावे यांना दिले आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172