जालना- देशामध्ये सध्याची परिस्थिती आहे ती फार काळ टिकणार नाही लवकरच बदलेल असा विश्वास ऑल इंडिया रजा अकादमीचे अध्यक्ष सय्यद नुरी यांनी व्यक्त केला आहे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माला दिनांक पाच सप्टेंबर 2025 रोजी दीड हजार वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सय्यद नुरी हे बोलत होते.
5 सप्टेंबर च्या तयारी निमित्त विविध उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे तसेच त्यांनी प्रार्थनास्थळे (विशेष तरतुदी) कायदा, 1991 ची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आणि जातीय सलोखा राखण्यासाठी त्याचे महत्त्व पटवून दिले.नूरी यांनी रझा अकादमीची प्रार्थनास्थळे कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ता म्हणून भूमिका मांडली, ज्यामुळे मशिदी आणि दर्ग्यांच्या सर्वेक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचेही ते म्हणाले.5 सप्टेंबर 2025 रोजी मुस्लिम 1500 वी ईद-उल-मिलाद-उन-नबी-प्रेषित मुहम्मद(स.अ) यांची जयंती साजरी करण्याची तयारी करत असताना, नूरी यांनी या प्रसंगी स्मरणार्थ अकादमीच्या देशव्यापी कार्यक्रमाचे तपशील दिले. उपक्रमांमध्ये मोफत वैद्यकीय शिबिरे, अन्न व औषधांचे वाटप, वृद्धाश्रमांना भेटी देणे यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, एकट्या मराठवाडा विभागात पवित्र कुराणच्या 1000 प्रती यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.. शिवाय पैगंबरांच्या(स.अ) चरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नुरी यांनी ऑल इंडिया मिलाद कौन्सिलच्या स्थापनेची घोषणा केली, ज्याचा उद्देश सांप्रदायिक एकता वाढवणे, पैगंबर मुहम्मदची(स.अ) शिकवण आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करणे आहे. त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष जमील अहमद रझवी ,मौलाना अब्बास रझवी, जफरोद्दीन, अब्दुल रहमान झिया, मुन्नावर खान, सय्यद शाजेद अली आदी उपस्थित होते.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172