जालना- जालना जिल्हा हा सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ -मोठे कलाकारही उदयास आले. तसेच “नाट्यंकुर” आणि “उत्कर्ष थिएटर” “श्रेयस” या संस्थांचे देखील देखील नाट्यप्रयोग इथे होत होते. बाल नाट्य स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा या दोन स्पर्धांसाठी जालन्यातील नाट्य रसिक आवर्जून वाट बघत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून कलाकारांना नाट्यगृहच उपलब्ध नसल्यामुळे ही चळवळ मोडीत निघाली आहे. राज्य नाट्य स्पर्धा जालना केंद्रावरच्या केवळ नाट्यगृह अभावी बंद पडली आहेआणि काही संस्थांच्या वतीने चालवल्या जाणारी नाट्य चळवळ ही सुविधा अभावी पुढे जात नाही आणि वाढली देखील नाही. तरीपण नाट्य कलावंत आपली तहान भागविण्यासाठी इतर ठिकाणी असे प्रयोग करायला लागले आहेत. याला केवळ जालना शहरात नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांना नाट्यगृह उपलब्ध नसल्याचेच कारण असल्याची खंत महाराष्ट्र राज्य 63 व्या नाट्य स्पर्धेत दुसरे आलेले आणि अंतिम फेरीत दाखल झालेल्या “घोळ मटन” या नाटकाचे लेखक सतीश लिंगडे यांनी व्यक्त केली आहे.
जालन्यातील नाट्य चळवळ आणि या नाटकाला मिळालेले यश यासंदर्भात सतीश लिंगडे यांची मुलाखत घेतली आहे विनोद जैतमहाल यांनी.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172