जालना -परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करत जालन्यात दीपक रणवरे यांनी दिनांक 28 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे .या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे .
दरम्यान जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी उपोषण कर्ते दीपक रणनवरे यांची काल दिनांक 30 डिसेंबर रोजी भेट घेतली आणि आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घालून देऊ असे आश्वासनही दिले. परंतु तेवढ्यावर उपोषणकर्त्यांचे समाधान न झाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली आहे. या भेटीच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह इतरही पक्षाच्या मान्यवरांची उपस्थिती होती .
चार दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला विविध समाजातून आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे .जोपर्यंत ठोस आणि लेखी निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा दीपक रननवरे यांनी दिला आहे .ब्राह्मण समाज बांधव रोज दीपक रणनवरे यांना पाठिंबा देण्यासाठी गांधी चमन येथील उपोषण स्थळी दाखल होत आहेत. जालना शहरासह महाराष्ट्रातील बीड, नांदेड, परभणी, पुणे, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आदी विविध गावच्या समाज बांधवांनी येऊन पाठिंबा दिला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172