जालना- जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारती नाहीत अशा ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र कार्यालयाची इमारत असावी या उदात्त हेतूने ग्रामविकास विभागाने एक निर्णय घेतला होता. 4 सप्टेंबर 2024 रोजी या शासन निर्णयानुसार “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” असं या योजनेला नाव दिलं. या योजनेमुळे जालना जिल्ह्यातील 161 ग्रामपंचायतींना नवीन इमारती मिळणार आहेत.
सप्टेंबर 2024 मध्ये हा निर्णय झाला आणि लगेच विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यामुळे आचारसंहितेच्या कचाट्यात हा निर्णय तसाच पडून होता. आता आचारसंहिता संपल्यानंतर परिस्थिती बदलली आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव होऊन शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उडान यांची नवनिर्वाचित आमदार म्हणून वर्णी लागलीआणि आता हळूहळू राजकारण सुरू व्हायला लागला आहे. रखडलेली कामे पूर्ण व्हावी त्यासाठी सरपंच गटविकास अधिकाऱ्याकडे चकरा मारत आहेत, गटविकास अधिकारी हे उडवाउडुळीचे उत्तर देत आहेत आणि विद्यमान आमदार हे संबंधित सरपंचांना प्रशासकीय मान्यता पाहिजे असेल तर माझ्याकडे पाठवा असं गटविकास अधिकाऱ्यांना सांगत असल्याचा आरोप या सरपंचांनी आज जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केला आहे .घनसांवगी मधील काही ग्रामपंचायतीच्या सरपंच सरपंचांनी आज जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. फक्त निवेदनच नव्हे तर त्यांनी ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठीच्या प्रशासकीय मान्यता संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनाच मिळाव्यात अशी मागणी ही केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.