जालना- विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विशेष करून आचारसंहितेच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरू होते. या संदर्भात आपण माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यानुसार आत्तापर्यंत एक लाख 13 हजारांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या प्रमाणपत्रामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका टॉप टेन मध्ये आहे. या सर्व प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रमाणपत्र स्थगित केले आहेत. अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणपत्र मागितली होती आणि सर्वात जास्त दिलीही आहेत. शासनाच्या अधिकृत यादीनुसार 11491 प्रमाणपत्र मागणीचे अर्ज आले होते. त्यानुसार जालना 2179, बदनापूर 613, भोकरदन,2594, जाफराबाद 2016, अंबड 1853 ,घनसावंगी 1353, परतुर 948, आणि मंठा 941 अशा एकूण 11491 प्रमाणपत्राची मागणी होती. त्यापैकी 7957 प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. 164 प्रमाणपत्र फेटाळण्यात आले आहेत तर विविध कारणांमुळे 3370 प्रमाणपत्र प्रलंबित आहेत.
दरम्यान या सर्व प्रकारासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुढील पंधरा ते वीस दिवसात सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना तसेच तहसीलदारांना या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत आणि त्यानुसार प्रमाणपत्र मागणाऱ्याने कोणकोणती कागदपत्रे जोडले आहेत त्या सर्व कागदपत्रांची शहानिशा केल्या जाईल. त्यानंतरच खोटे दाखले दाखल करणाऱ्यांवर आणि त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.( सविस्तर माहिती पहा वरील व्हिडिओमध्ये.)
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172