जालना- ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी 28 नोव्हेंबर पासून आठ दिवस आमरण उपोषण करणारे ब्राह्मण समाजाचे नेते दीपक गोपाराव रणनवरे, वय 51 हे बुधवार दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. या संदर्भात दीपक रणनवरे यांची पत्नी भारती दीपक रणनवरे, वय 48 यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दीपक रणनवरे हरवल्याची नोंद केली आहे. ब्राह्मण समाजासाठी नेहमीच झटत राहणारे दीपक रणवरे हे सुरुवातीपासूनच धडाडीचे नेतृत्व म्हणून काम करत आहेत. ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनाची मुहूर्तमेढ त्यांनी जालन्यात रोवली आहे.
रणनवरे यांचे संग्रहित भाषण
समाजाच्या विविध मागण्यांसाठी नेहमीच काही ना काहीतरी आंदोलने ,निदर्शने ते करत आहेत. परंतु सर्वात मोठे आंदोलन हे दिनांक 28 नोव्हेंबर पासून जालना येथील गांधी चमन परिसरात आमरण उपोषण करून त्यांनी केले. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ही यावेळची प्रमुख मागणी होती आणि या मागणीला यशही आले आहे. आठ दिवसांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेसाठी आमंत्रण आल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले आणि नुकतेच हे महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनाने ठरावही घेतलेला होता.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172