जालना -ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. ज्याच्या कार्यारंभाचे आदेश हे निघालेले निघालेले आहेत. कामे भरपूर आणि कंत्राटदार कमी असल्यामुळे एका कंत्राट दाराला अनेक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे ,त्यामुळे कामे वेळेत कशी पूर्ण करून घेता येईल यावर आपला भर राहणार आहे .अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जाळन्यात दिली.
जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनांच्या ई उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे ,आमदार बबनराव लोणीकर ,आमदार नारायण कुचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर ,जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले ,”ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून मला पाणीवाला बाबा व्हायचंय”. असे म्हणत असतानाच पत्रकारांनी विनायक राऊत यांचा विषय काढताच विनायक राऊत पाणी वाले आहेत का ?असे म्हणत मी मी त्यांच्यावर बोलायला इथे आलो का ?असा प्रश्न करून त्या विषयावर बोलणे टाळले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com