जालना- जालन्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे म्हणजेच दिनांक एक मे रोजी जालना येथे मुख्य ध्वजारोहण झाले. साहजिकच त्यांनी जालना जिल्ह्यात पर्यावरणात प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले. परंतु कुठे कोणते काम झाले हे मात्र समजले नाही.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने नदी पात्रांची स्वच्छता आणि त्यामधील अतिक्रमण काढून घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर ही अतिक्रमणे प्रशासन स्वतः काढत नाही तर त्यासाठी सामाजिक संस्थांना नदीपात्रातच उपोषण करावे लागत आहे. त्यांच्या रेट यापुढे प्रशासनाला ही अतिक्रमणे काढावी लागत आहेत ही बाबEdtv News ने निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ना. मुंडे म्हणाल्या, की अशी अतिक्रमणे सगळीकडेच आहे. त्यामुळे सरकारने कठोर भूमिका घेत ही अतिक्रमणे काढून घ्यावीत. त्यांच्या या आवाहनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना मात्र एक प्रश्न पडला आणि तो म्हणजे सरकार म्हणजे कोण? आणि कोणत्या सरकारने ही अतिक्रमणे काढावीत?
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172