जालना- जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हे गाळ काढण्याचे काम सामाजिक संस्थांच्या मदतीने केल्या जात आहे. दरम्यान खरे तर हे काम लोकप्रतिनिधीच्या मदतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने व्हायला हवे, मात्र हे दोघेही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सामाजिक संस्थां, संघटना, उद्योजक यांनी एकत्र येत गेल्या 13 वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे.
जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निजाम काळामध्ये जालन्यात असलेल्या एका पारसी परिवाराने निजामा कडून निधी घेऊन 1930 ते 1935 अशा पाच वर्षांमध्ये घाणेवाडी जलाशयाचे काम पूर्ण केले आणि कुठलेही विद्युत पंप नसताना जालना शहराला आठ किलोमीटर पाणी पोहोचविण्याची कल्पकता या जलाशयाचे आहे. परंतु काळाच्या ओघांमध्ये या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचत गेला आणि पाणीसाठा कमी होत गेला. याउलट जालन्यातील लोकसंख्या वाढत गेली पाण्याची मागणीही वाढत गेली. परंतु तलावाच्या जलसाठ्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही 2010 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना हा तलाव पूर्णपणे कोरडा पडला आणि सर्वांचेच डोळे उघडले .आता करायचं काय? हा यक्ष प्रश्न समोर उभा राहिला आणि पुढच्या वेळी ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून सामाजिक संस्था उद्योजक, दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणि स्थापन झाला तो” घाणेवाडी जलसंरक्षण मंच” या मंचाच्या मदतीला इतरही संघटना, संस्था धावून आल्या आणि पाहता पाहता या तलावातील गाळ काढायला सुरुवात झाली. गेल्या 13 वर्षांपासून या तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे शेतीत सुपीक गाळ गेल्यामुळे शेतीचे उत्पादने वाढत आहे आणि जलसाठाही वाढत आहे, परंतु या चांगल्या कामाला जिल्हा प्रशासनाची ना आर्थिक मदत आहे ना कोणत्याही लोकप्रतिनिधीची! त्यामुळे निधी उभा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172