जालना- राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विभागाचे मंत्रिपद भूषवले आहे ,परंतु मंत्री पदाच्या कार्यकाळात जेवढे आरोप झाले नाहीत तेवढे आरोप मागील महिन्यामध्ये झाले. मराठा आरक्षणाला खत-पाणी घातल्याचा मोठा आरोप सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यानुसारच हे सगळं केले आणि आमदार टोपे यांच्या कारखान्यातच या सर्व प्रकाराला खतपाणी घातल्याच्या आरोपांचा राजेश टोपे यांच्यावर भडीमार केला. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राजेश टोपे यांची पुण्यामध्ये पाणी वाटपाच्या संदर्भात झालेल्या एका बैठकीत भेटही झाली, आणि पुन्हा चर्चेला उधाण आले.
इकडे जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर अजित पवारांचे बॅनर त्यावेळेस दिसत होते .आणि दादा भैय्या याचे नाते हे घट्ट आहे. अजित पवार हे वडीलकीच्या नात्याने राजेश टोपे यांना “अरे राजेश” असे म्हणतात .आणि या हक्काच्या नात्याने राजेश टोपे यांना टाळी मागितली तर, तर आमदार टोपे नाही म्हणू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावरील असलेले बॅनर हे काढण्यासाठी देखील विलंब होत होता. परंतु शेवटी शरद पवार यांना तुतारी मिळाली आणि राष्ट्रवादी भावनावरील हे बॅनर काढावे लागले. कदाचित इच्छा नसली तरी आचारसंहितेमुळे देखील ते काढावे लागले असेल.
सध्या या राष्ट्रवादी भवनावर कुठलेच बॅनर नाही .परंतु मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांच्यासोबत आमदार राजेश टोपे यांनी दिलेल्या टाळीचा फोटो मात्र अजून सर्वत्र फिरत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. परंतु एक मात्र निश्चित की दादा भैय्या यांच्या घनिष्ठ संबंधांमुळे भविष्यात जर दादांनी भैय्याला “दे टाळी” म्हटले तर कदाचित भैय्या नाही म्हणू शकणार नाहीत. कारण हीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी निर्माण झाली होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेस पासून फारकत घेतली आणि स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळी होती.आमदार राजेश टोपे यांचे वडील स्वर्गीय माजी खासदार अंकुशराव टोपे हे काँग्रेसमध्ये होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी त्यांनी दीड महिन्याचा वेळ घेतला होता .कदाचित तशीच परिस्थिती आता देखील निर्माण झाली आहे. कारण राजेश टोपे हे मुच्छद्दी राजकारणी असलेल्या स्वर्गीय अंकुशराव टोपे यांच्या भट्टीत भाजलेले नेतृत्व आहे.(बरा न मानो होली है)आपणा सर्वांना होळीच्या शुभेच्छा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172