Advertisment
बाल विश्व

तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू


जालना

बदनापूर तालुक्यातील कुसळि या भागात असलेल्या
पाझर तलावात कालच्या पावसाने 5 ते 6 फूट पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्यानेपाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तीन बालकांचा करूण अंत झाल्याची घटना तालुक्यातील कुसळी येथे घडली. सख्खे भाऊ बहिण व एक चुलतभाऊ अशा एकूण तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मनोज, दिपाली व आकाश हे मृत्यूमुखी पडलेल्या बालकांची नावे आहेत.

कुसळी गावाजवळच शेतवस्तीवर अंकुश वैद्य व संजय वैद्य हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबियांसह राहतात. सदरील शेतकऱ्यांच्या शेतीशेजारीच बैलभरा शिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील नाल्यावर पाझर तलाव क्रमांक 1 निर्माण करण्यात आलेला आहे. या छोटयाशा नाल्यावर गायरान जमिनीवर बनलेल्या या पाझर तलावात काल दि. 9 जून रोजी झालेल्या पावसामुळे 5 ते सहा फूट पाणी साचलेले होते. वैद्य कुटुंबिय नेहमीप्रमाणे शेतीचे काम करत असतानाच या कुटुंबातील मनोज अंकुश वैद्य (वय 11), दिपाली अंकुश वैद्य (वय 10), आकाश (अक्षय) संजय वैद्य (वय 7) हे तिघे खेळत खेळत या तलावाच्या काठावर गेले आणि पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले. शेतीकामात मग्न असलेल्या वैद्य कुटुंबियांना मुले दिसत नसल्यामुळे त्यांनी पाझर तलाव व इतरत्र या मुलांचा शोध सुरू केला असता त्यांना ही दुर्देवी घटना दिसली. विशेष म्हणजे सदरील दोन्ही शेतकरी अल्पभूधारक असून दोघांनाही एक एक एकर शेतजमीन आहे.

सदरील घटना समजताच आरडाओरड झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांसह सरपंच भाऊसाहेब वैद्य, संदीप वैद्य, राजेंद्र वैद्य, बाबासाहेब वैद्य आदींनी मदतकार्य करून मोठया परिश्रमानंतर सदरील बालकांना तलावात बाहेर काढले तोपर्यंत या बालकांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या शेतकरी कुटुंबियांवर अचानक कोसळलेल्या या आपत्तीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button