जल आक्रोश मोर्चात तृतीयपंथीयांनी लुटला नृत्याचा आनंद; फडणवीस यांनीही केले मार्गदर्शन

जालना- भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना जालना नगरपालिकेला पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र आजही या योजना अपूर्ण आहेत. त्यामुळे जालनेकरांना पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे आणि आता नगरपालिकेच्या निवडणुकाही तोंडावर आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज जालना नगरपालिकेवर “जल आक्रोश मोर्चा” काढण्यात आला.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मामा चौकातून निघालेला हा मोर्चाचा गांधीचमन परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्या भाषण आणि समारोप झाला. दरम्यान या मोर्चामध्ये त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदन चे आमदार संतोष दानवे ,बदनापूर चे आमदार नारायण कुचे, ओबीसीचे नेते अशोक पांगारकर, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्याण नेमके काय म्हणाले फडणवीस हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com