भूतकाळाचे ओझे वाहू नका; 2025 मध्ये युद्धापेक्षा तणावामुळे मृत्यूंची संख्या वाढेल!- निलेश सुराणा
जालना -आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक क्षेत्रात मॅनेजमेंट शिकण्याची गरज आहे, कारण कर्मचारी, सहकारी ज्या संस्थेत काम करतात ती संस्था आपली म्हणून तिथे काम केल्या जात नाही. आणि त्यामुळे संस्थेला अपेक्षित असलेला परतवाम मिळत नाही. त्यामुळे ताण-तणाव वाढत आहे .विशेष करून सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हा तनाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या विवाहितांचे घटस्फोट देखील मोठ्या प्रमाणात आहेत. असा दावा देश विदेशात काम करणाऱ्या आणि 2004 पासून विविध खंडांमध्ये मॅनेजमेंट क्षेत्रात योगदान देणाऱ्या निलेश सुराणा यांनी केला आहे .हा दावा करत असतानाच भूतकाळातील वेगवेगळे ओझे सोबत न वाहता गतीने येत असलेल्या नवीन भविष्यकाळाचे स्वागत करा असे त्यांनी सांगितले.
पल्लवांकुर ग्रुपच्या वतीने आयोजित इगो टू इको या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून डॉक्टर अतुल जिंतूरकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना निलेश सुराणा यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास,विविध क्षेत्रातील विभाजन आणि आपल्याला असलेल्या अपेक्षेपेक्षा आपण कमी करत असलेले काम, पद्धतीमुळे मायग्रेन आजार वाढले आहेत आणि त्यामुळेच आपल्या जीवनावर याचा परिणाम होत आहे. या सर्व बाबींचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर झाल्यामुळे पूर्वी नैराश्याचे प्रमाण जे अत्यल्प होते ते सध्या 9% वर जाऊन पोहोचले आहे. भविष्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा ताण तणाव कमी करण्यासाठी पर्यावरण वाढवा, विभागणी करणाऱ्या कामापेक्षा एकत्र येऊन काम करण्यावर भर द्या, आपल्याला अपेक्षित असलेले काम करा, भूतकाळाशी काही देणे घेणे नसताना आपण विनाकारण त्यांना सोबत घेऊन बोजा वाढवतो तो दूर करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पल्लवांकुर ग्रुपच्या वतीने डॉ. पद्माकर सबनीस, डॉ. नामदेव वाघ, डॉ. नितीन गादेवाड, डॉ. आनंद बोरीवाले डॉ. अश्विनी कुमार काथार ,आणि डॉ. तुषार शिंदे यांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172