उभ्या कंटेनर खाली अल्टो घुसली; तिघेजण ठार
अंबड- जालना- बीड महामार्गावर समर्थ सहकारी साखर कारखान्यासमोर रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या कंटेनर खाली कार घुसून झालेल्या अपघातामध्ये तिघेजण ठार झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
बक्षाची वाडी येथे राहणारे अमोल कैलास जाधव वय 25, ओंकार बळीराम गायकवाड वय 21, आणि माऊली संभाजी गायकवाड वय 11 हे तिघेजण दुपारी तीन वाजेच्या सुमारास अल्टो 800 क्रमांक एम एच 20 बी एन 70 73 ने बीड कडे जात होते. त्याचवेळी समर्थ साखर कारखान्याच्या समोरच्या बाजूला समर्थ बँकेसमोर बीड कडे जाणारा कंटेनर क्रमांक एच आर 38 डब्लू 92 14 हा उभा होता .या कंटेनरच्या खाली अल्टो कार घुसली आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयानक होता की जेसीबी आणि दोरीच्या साह्याने अल्टोला पाठीमागे ओढून काढावे लागले .गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील प्रक्रिया केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172