डॉ. विजय चोरमारे यांना “दु:खी” राज्य पुरस्कार घोषित; ” कवितेचा पाडवा ” मध्ये नागराज मंजुळेंच्या हस्ते होणार वितरण
जालना- येथील स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ” दु:खी ” राज्य काव्य पुरस्कार कोल्हापूर येथील कवी, लेखक, संपादक, चरित्रकार, डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे .पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25 हजार रुपये रोख , स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या गुढीपाडव्याला बुधवारी ( ता.22) सायंकाळी 6.30 वा.जे.ई.एस.महाविद्यालयाच्या प्रांगणात” कवितेचा पाडवा ” या कार्यक्रमात सिने-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ लेखक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित केला जाईल.
आज पत्रकार परिषदेत संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, डॉ. संजीवनी तडेगांवकर, पंडितराव तडेगांवकर, विनोद जैतमहाल, यांनी पुरस्काराची घोषणा केली.पुरस्कार वितरणानंतर नागराज मंजुळे व डॉ. विजय चोरमारे यांची मुलाखत डॉ. संजय चौधरी ( करमाळा) आणि डॉ. संजीवनी तडेगांवकर घेणार आहेत. या वेळी दोन्ही मान्यवरांची सुरेल काव्यमैफल तसेच कार्यक्रम स्थळी प्रसिद्ध चिञकार राजू बाविस्कर ( जळगाव) यांच्या चिञांचे प्रदर्शन पहावयास उपलब्ध असेल,रसिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com