अभाविप व राष्ट्रीय कला मंच सादर करणार गीत रामायण
जालना- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच यांच्या वतीने दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर गीतरामायनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे ,त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अभाविपचे शहराध्यक्ष वैभव अंबावडीकर यांनी आज दिली.
या गीतरामायणामध्ये राष्ट्रीय कला मंचचे सदस्य अंजली काजळकर प्रणव जोशी वेदांत कुलकर्णी चिन्मय कानडे समृद्धी इंगेवार सौरभ गोपने प्रतिक कुलकर्णी श्रीनाथ देशपांडे यांचा सहभाग आहे कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून राम भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172