Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

अंबड तालुक्यात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू

जालना -मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी  केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी झालेले रास्ता रोको पाहता तसेच काल दिनांक 25 रोजी मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आहेत .त्या पार्श्वभूमीवर बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे, या संदर्भात जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी माहिती घेऊन खात्री केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार दिनांक 26 म्हणजेच आज मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकाराचा वापर करत त्यांनी “वेळेअभावी सर्व संबंधितांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने ,मी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जालना मला प्राप्त अंगीभुत अधिकाराचा वापर करून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये संपूर्ण अंबड तालुक्यातील दिनांक 26 फेब्रुवारी 2024 चे रात्री एक वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत आहे असे आदेश काढले आहेत “सदरील संचारबंदी आदेश दुकाने ,आस्थापना, यांनाही लागू राहतील ,तसेच कोणतेही प्रकारचे शस्त्र ,ज्वलनशील पदार्थ स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत. या संचारबंदी मधून पुढील बाबींना सूट असणार आहे. शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग इतर महामार्गावरील वाहतूक ,दूध वितरण, पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना रेल्वे व्यवस्था दवाखाना वैद्यकीय केंद्रे विद्युत पुरवठा प्रसार माध्यमे मीडिया यांचा समावेश आहे

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button