जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक एस.आय.टी.चे प्रमुख. मराठा आरक्षण हिंसाचार प्रकरणी एसआयटी स्थापन

जालना- जालना जिल्ह्यामध्ये सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जाळपोळ, हिंसाचार ,लाठीमार आणि एकूणच यासंदर्भातील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने विशेष तपास पथक (एस.आय. टी. स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम )स्थापन करण्यात आली आहे. या पथकाच्या प्रमुख पदी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप कर्णिक यांनी 2008 ते 2010 दरम्यान जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांना जालन्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती माहित आहे.गुंड ,आणि खंडणी बहाद्दर यांचा कर्दनकाळ म्हणून त्यांचा दरारा होता. सविस्तर बातमी पाहण्यासाठी व्हिडिओला क्लिक करा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172