आषाढी विशेष ;सात दिवसात सात रूपात भक्तांना दर्शन देणारे”आनंदी स्वामी”
जालना- प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे महत्त्व असतं आणि त्यामुळेच सामान्य माणूस त्या वैशिष्ट्याकडे आकर्षिला जातो. असेच काही वेग-वेगळे वैशिष्ट्य आहेत प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यातील श्री. आनंदी स्वामी महाराज यांची.
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आनंदी स्वामी महाराजचं मंदिर जालन्यात स्थापित झालं आणि हळूहळू भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं हे दैवत म्हणून नावलौकिकाला आले. चार मजली लाकडी गाभारा आजही सुस्थितीत इथे पाहायला मिळतो. त्यासोबत या यात्रेचे दोन महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगता येतील त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य म्हणजे श्री आनंदी स्वामी महाराज यांचे सातही दिवस वेगवेगळे अवतार भक्तांना पाहायला मिळतात. वारानुसार हे वेगवेगळे अवतार आहेत. त्यामध्ये दत्तावतार, मल्हारी मार्तंड ,शिवपार्वती, राम सीता, वेंकटेश, शेषशाही भगवान हे अवतार पाहण्यासाठी भक्तही गर्दी करतात.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172