1)संभाजीनगर रस्त्यावर टपरी हटवल्यावरून राडा.2) बस आगारात वाहक चालकांसह मेकॅनिकचे घसे कोरडे, पाण्या ऐवजी सापडतात दारूच्या बाटल्या!

जालना- आज दुपारी एक वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर असलेल्या राजुर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे महानगरपालिकेच्या वतीने हटविण्यात आली. यावेळी अतिक्रमणातील टपरी दुसऱ्या ठिकाणी ठेवत असताना दोन गटात राडा झाला आणि यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत .जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया देखील चंदंनजिरा पोलीस ठाण्यात सुरू आहे.
जालना- जालना बस स्थानकाच्या आगारामध्ये वाहक चालकांसह मेकॅनिकलाच पाणी मिळत नसल्याने त्यांचे घसे कोरडे पडले आहेत. येथून बाजूलाच असलेल्या नदीकाठच्या विहिरीतून आगाराला पाणीपुरवठा होतो. परंतु ही पाईपलाईन फुटली असल्याचे आगार प्रमुख श्री जयवाळ यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी पाण्याचे फिल्टर बसवलेले आहे परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून ते बंद आहे ,फिल्टर च्या ठिकाणी पाणी मिळाले नाही परंतु दारूच्या बाटल्या मात्र मिळाल्या या संदर्भात देखील जैवाळ यांनी लोक दारू पितात त्याला मी काय करू? असे म्हणत वाहन चालकांची खिल्ली उडवली आहे. बाजूला असलेल्या विहिरी मधून पाणीपुरवठा होतो ही विहीर जर पाहिली तर कोणीही पाणी पिण्यासाठी धजावणार नाही अशी परिस्थिती ही निर्माण झाली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172