Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » नद्यांचे पुनरुज्जीवन ही लोकचळवळ व्हावी- जिल्हाधिकारी डॉ. राठोड
    Jalna District

    नद्यांचे पुनरुज्जीवन ही लोकचळवळ व्हावी- जिल्हाधिकारी डॉ. राठोड

    EdTvBy EdTvApril 13, 2022No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना – “स्वप्न उद्याचे, स्वच्छ नद्यांचे”
    हे घोषवाक्य घेऊन  कुंडलिका -सीना नदीच्या स्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली .यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, “माणसाला माणूस बनवण्यासाठी नद्यांचा मोठा वाटा आहे ,परंतु आज माणूस नद्यांना विसरत चालला आहे. अशा परिस्थितीत मध्ये ज्या संस्थांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा विडा उचलला आहे त्या सर्वांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे. त्यांच्या या कार्याला लोकांनी आपले कार्य समजून लोक चळवळीचे स्वरूप द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलीका -सीना रेजुवेनेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन जालना ,च्या वतीने कुंडलिका नदीपात्रात आज अभियानाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड बोलत होते.

    कार्यक्रम लोक चळवळीचा असल्यामुळे कोणीही अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उद्घाटक, अशा मानपानाचे पद न देता सर्वच जन सारखे समजून ही चळवळ उभी केली आहे. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी संदिपान सानप ,उद्योगपती घनश्याम गोयल, सुनील रायठठ्ठा, कैलास लोया, शिवरतन मुंदडा ,ओमप्रकाश चितळकर, जालना मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुश राऊत, रमेश देवडकर, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक डॉ. वासरे, अमृत शिंदे, यांच्यासह समस्त महाजन च्या प्रभारी नूतन देसाई यांची यावेळी उपस्थिती होती.

    पुढे बोलताना डॉ. राठोड म्हणाले की लोकसहभागातून ज्याला जसे जमेल तसा त्याने खारीचा वाटा उचलला पाहिजे .या प्रकल्पाअंतर्गत घाणेवाडी ते रोहनवाडी दरम्यान पुढील दोन-तीन वर्षांमध्ये नदी स्वच्छ करणे, भूमिगत बंधारे बांधणे, नदीच्या दोन्ही काठांवर झाडे लावणे, आणि नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडणे ही कामे केली जाणार आहेत.

    *नूतन देसाई*
    समस्त महाजन ट्रस्टच्या प्रभारी नूतन देसाई यांनी आज पहिल्यांदाच समस्त महाजन ट्रस्त विषयी सविस्तर माहिती दिली .हे ट्रस्ट म्हणजे कोणा एकाच्या नावाने नव्हे तर समस्त महाजन म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारे असा त्याचा अर्थ आहे, आणि “जिओ और जिने दो” या घोषवाक्यावर त्यांचे काम चालू आहे. पाणी क्षेत्रात काम करत असतानाच गो शाळेवर देखील भर दिला जातो .गो शाळेला स्वतंत्र बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून समस्त महाजन ट्रस्ट बाजूला सरकते ,त्यामध्ये कुठेही समस्त महाजन ट्रस्ट चा वाटा किंवा  मालकी नसते. केवळ धरणी मातेला सुजलाम-सुफलाम करण्याचा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि खेड्यातील संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी  हे उपक्रम राबविले जात आहेत. शेती सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि त्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा असे उपक्रम हाती घेण्यात आले होते. 2016 मध्ये घनसांवगी तालुक्यात  जलक्रांती टीम च्या माध्यमातून देवी दहेगाव या गावामध्ये जलक्रांती करण्यात आली आहे. आजपर्यंत कुठेही मिळाला नाही एवढा लोकसहभाग घनसांवगीला मिळाला असल्याचेही नूतन देसाई यांनी सांगितले .हे सांगतानाच जालन्याला जर समृद्ध करायचे असेल तर कुंडलिका आणि सीना नदीच्या खोलीकणाची नितांत आवश्यकता आहे, आणि त्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योगपती सुनील रायठठ्ठा यांनी केले. यावेळी  मान्यवरांनी आपल्या सूचनाही मांडल्या. सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.

    *मान्यवरांच्या सूचना* राजकीय मंडळींना नदीपात्रात कोणतेही पीक घेऊ देऊ नये किंवा अतिक्रमण करू देऊ नये* शहरातून वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर संरक्षण भिंत बांधावी, जेणेकरून गावातील कचरा नदीपात्रात येणार नाही* नदीपात्रात कचरा  टाकणाऱ्याचे छायाचित्र प्रसारित करावे ते प्रसारित करणाऱ्याला पाचशे रुपये बक्षीस आणि कचरा टाकणाऱ्या ला दंड आकारावा* पुलाचे बांधकाम सुरू असतानाच त्या खाली बंधारा बांधावा जेणेकरून पाणी अडून राहील *नदीपात्रात सोडण्यात येणारे घाण पाणी बंद करावे किंवा सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा.

    https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
    *दिलीप पोहनेरकर*
    ९४२२२१९१७२
    https://edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    cla dr rathod edtv kundlika river samast mahajan trust sina
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleकॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात पुरुषोत्तम जयपुरिया यांचा होणार शपथविधी
    Next Article 64 योगिनी देवीचं आणि पायामध्ये माणसांचे सापळे असणारे हे अनोखे गाव
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    थेट आषाढी वारी मधून….

    June 29, 2025

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    June 28, 2025

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    June 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,052 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025902 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025803 Views
    Don't Miss
    Breaking News June 29, 2025

    थेट आषाढी वारी मधून….

    जालना- https://youtu.be/9ioPOIdDYUA?si=nTknkmLh7sIN7-wf

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.