Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » एक पाऊल स्त्री सक्षमीकरणासाठी
    Jalna District

    एक पाऊल स्त्री सक्षमीकरणासाठी

    EdTvBy EdTvMarch 8, 2022No Comments5 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    “शक्ती, संस्कृती, प्रगती, प्रकृती सर्वांत ‘ती’ चा उल्लेख होत असतो. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पादक्रांत करीत आहे. असे एकही क्षेत्र नाही की जेथे महिलांनी त्यांच्या यशाची मोहर उमटवलेली नाही. असे असले तरी काही महिलांना विविध कारणांमुळे अपेक्षित प्रगती करता येत नाही. काहींना सामाजिक स्तरावर अडचणींना सामोरे जावे लागते. तर काही कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात. अशा माहिलांना त्यांच्या अडी अडचणीवर मात करुन सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. त्यासाठी विविध योजना महिला व बाल विकास विभगामार्फत राबविल्या जातात. त्यातील काही योजनांची ही ओळख.”

    https://edtvjalna.com/wp-content/uploads/2022/03/advत_SD-360p.mp4

    * मनोधैर्य योजना : महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र संकीर्ण-2011 प्र.क्र. 6/का-2, दि. 21.10.2013 अन्वये बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ल्यातील पिडीत महिला व बालकांना किंवा त्यांच्या वारसदारांना अर्थ सहाय्य करण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने मनोधैर्य योजना सुरु केली आहे. दि.1 ऑगस्ट 2017 पासुन ही योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातुन अंमलबजावणी करण्यात येते. पिडीत महिला, बालक व त्यांच्या वारसदारांना गरजांनुसार वैद्यकीय मदत, निवारा, मानसोपचार तज्ञांची सेवा इत्यादी आधार सेवा उपलब्ध करुन त्यांचे पुनवर्सन करण्याचे काम करण्यात येते.”

    * जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन : शा.नि.क्र.2013/11 दि.4 मार्च 2013 च्या शासन निर्णयानुसार समस्या ग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा या करीता जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार तालुका स्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तीसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

    * शासकीय महिला राज्यगृहे : 16 ते 60 वर्ष वयापर्यंतच्या निराधार, निराश्रित, परित्यक्ता, कुमारी माता, संकटग्रस्त व अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय, संरक्षण व मुलभूत सुविधा पुरवून त्यांचे नोकरी, व्यवसाय आणि विवाह द्वारे पुनर्वसन करण्याकरीता महिला राज्यगृह कार्यरत आहेत. या महिला राज्यगृहात कोर्टामार्फत, पोलसांमार्फत, स्वेच्छेने इतर संस्थेतून बदलीवर गरजू महिला प्रवेश घेऊ शकतात.

    *महिला संरक्षण गृहे : अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 अन्वये पोलिसांनी वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या महिलांना व स्वेच्छेने दाखल होण्याऱ्या महिलांना संरक्षण देऊन पुर्नवसन करण्याकरीता शासनातर्फे सरंक्षण गृहे चालविण्यात येतात.

    * शुभमंगल सामुहीक / नोंदणीकृत विवाह योजना : गरजु शेतकरी/शेतमजुर विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी ही योजना असुन या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थ्याला 10,000/- रु.आर्थिक मदत करण्यात येते. सदर सुधारीत योजना जिल्हा नियोजन समिती मार्फत राबविली जाते.

    * वन स्टॉप सेंटर : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत (निवारा), वैद्यकीय सुविधा, समुपदेशन, पोलीस मदत व न्यायालयीन कामात मोफत विधीज्ञ सेवा तात्काळ मिळण्यासाठी व संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याचे उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत (One Stop Crisis Center) सखी हि योजना केंद्र शासनाकडुन राज्यात राबविण्यात येत आहे. सदर वन स्टॉप सेंटर योजना जालना जिल्हयात सुरु असुन त्याचे कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी कार्यरत आहे.

    *घरगुती हिंसाचारापासून महिलांचे सरंक्षण कायदा 2005: सदर कायदा केंद्र शासनाच्या दि.17.10.2006 च्या अधिसुचनेद्वारे दि. 26.10.2006 पासुन देशभरात अंमलात आणला आहे. कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण व्हावे या करिता जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत गरजु महिलांना समुपदेशन, वैद्यकीय सुविधा आणि कायदेविषयक मदत मिळवुन देण्यात येते.

    * केंद्र शासनाच्या योजना :

    1) नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे 2) अल्पमुदती निवारा गृह

    ब) बाल विकासाच्या योजना :-

    बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2000 अंतर्गत योजना सुधारित अधिनियम – 2006 अन्वये बालगृहे, बालकाश्रम, बालसदन, अनाथालय यांना बालगृहे म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

    1) बालगृह (शासकीय / स्वयंसेवी) :- काळजी व संरक्षणाची गरज असणारे, अनाथ, एक पालक, बेघर, निराश्रीत बालकांना निवारा व शिक्षण मिळावे याकरिता बाल कल्याण समितीच्या आदेशाने अशा गरजु बालकांना बालगृहामध्ये प्रवेश देण्यात येतो.

    2) निरीक्षणगृहे (शासकीय / स्वयंसेवी ) :- वरील अधिनियमामधील तरतूदी नुसार पोलीसांचे मार्फत ताब्यात घेतलेले विधी संघर्षित बालक तसेच बालन्याय मंडळाच्या आदेशानुसार संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना निरीक्षणगृहात, बालगृहात ठेवण्यात येते.

    3) अनुरक्षणगृहे : निरीक्षण, बालगृहातील मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी असलेल्या निराधार निराश्रीत बालकास तीन वर्षापर्यंत त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने येथे ठेवण्यात येते.

    4) बाल संगोपन योजना : अनाथ बालके व निराश्रित बालकांना संस्थेत दाखल करुन घेण्याऐवजी कौटूंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास होण्यास संधी उपलब्ध करुन देण्यात येते मुलांसाठी कुटूंब मिळवून देण्यासाठी ही योजना कार्यरत आहे. सदर योजने अंतर्गत प्रत्येक मुलाला शैक्षणिक मदत म्हणुन 1100 रु. दरमहा थेट बालकांच्या खात्यात अनुदान वितरीत करण्यात येते. कोविड-19 मध्ये एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

    5) दत्तक योजना : बाल न्याय अधिनियम 2015 नुसार काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना कुटुंब मिळवुन देण्याकरीता ही योजना असुन हि सर्व प्रक्रिया कारा गाईडलाईन नुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. www.cara.in या साईटवर अधिक माहिती मिळु शकते.

    * केंद्र शासनाच्या योजना : 1) रस्त्यावरील बालकांसाठी योजना 2) शिशू गृह

    क) इतर उपक्रम

    v जिल्हा बाल संरक्षण कक्ष :

    · जिल्हयातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा याकरीता जिल्हा बाल संरक्षण कक्ष स्थापन असुन या अंतर्गत बालकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

    · कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 10 बालकांना महाराष्ट्र शासनाच्या नविन योजनेअंतर्गत 5 लक्ष रु. मुदतठेव स्वरुपात लाभ मिळवुन देण्यात आला आहे.

    · तसेच केंद्र शासनाच्या PM CARE अंतर्गत 10 लक्ष रु. मदतीकरिता 11 बालकांचे परिपुर्ण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्यात आलेले आहे.

    · कोविड- 19 मुळे एक किंवा दोन पालक गमावलेले बालके तसेच इतर काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके अशी एकूण 453 बालकांना बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा 1100 रु. अनुदान देण्यात येते.

    * अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 : या अधिनियमात पहिल्यांदाच गुन्हा केलेल्या ज्या गुन्हयासाठी फाशी किंवा जन्मपेठेची शिक्षा नाही अशा गुन्ह्याकरिता शिक्षा न करता करागृहात पाठविण्यापेक्षा जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्या देखरेखीखाली सोडण्यात येते .

    *राज्य महिला आयोग : स्त्रियांवरील अन्यायाचे निराकरण होऊन त्यांना विकासासाठी दिशा उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय महिला आयोगाप्रमाणे महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना केली आहे.

    *महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुरस्कार : 1) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार-

    (राज्यस्तरीय, विभागीय स्तरावर (स्वयंसेवी संस्थांना, जिल्हास्तरीय) 2) राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 3) नारी शक्ती पुरस्कार.

    संकलन;अमोल  महाजन,

    जिल्हा माहितीकार्यालय,जालना.

    ****************************************दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२  https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv

                                                                                         

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    amol mhajan dio jalna edtv niramay m rtm saakshi. m womens day
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleडॉ. पंजबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे  हिरकणी पुरस्कार जाहीर
    Next Article जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    थेट आषाढी वारी मधून….

    June 29, 2025

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    June 28, 2025

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    June 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,052 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025902 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025803 Views
    Don't Miss
    Breaking News June 29, 2025

    थेट आषाढी वारी मधून….

    जालना- https://youtu.be/9ioPOIdDYUA?si=nTknkmLh7sIN7-wf

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.