Advertisment
Breaking NewsJalna Districtजालना जिल्हा

लक्ष प्राप्तीसाठी आणि गुणांच्या फायद्यासाठी धनुर्विद्या- प्रा.वर्मा

 जालना -लक्ष प्राप्ती करून 25 गुणांचा फायदा घेण्यासाठी धनुर्विद्या चे महत्त्व आहे. सामान्य जीवन जगत असताना सातत्य आणि ध्येय साधण्यासाठी याचा उपयोग होतो. असे मत जालना येथील जे.ई. एस. महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. हेमंत वर्मा यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत धनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धा या केंद्रावर पार पडली. विद्यापीठांतर्गत 18 संघांनी आणि 70 खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग नोंदवला होता. तीन गटांमध्ये झालेल्या या निवड चाचणीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत खेळण्यासाठी पाठविले जाणार आहे.  शैक्षणिक स्तरावर तर या खेळाचा फायदा होतोच ,त्याच सोबत क्रीडा धोरणात आणि खेलो इंडिया मध्ये या खेळाचा समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांना पंचवीस गुणांचाही  फायदा होतो.  सोबतच अभ्यास करताना आणि प्रत्यक्षात जीवन जगताना ध्येयप्राप्तीसाठी सातत्य कसे टिकवायचे! आणि लक्ष प्राप्ती कसे करायचे याचे धडे देखील या खेळाच्या माध्यमातून मिळतात असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक प्रकाश दुसेजा यांचीही उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button