जालना -गेल्या पाच दिवसांपासून काश्मीर घाटी मध्ये भारतातील सात हिंदूंची हत्या करण्यात आली. आणि एक शीख महिलाही यामध्ये मारेकऱ्यांची बळी ठरले आहे. या घटनेचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मामा चौकात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी मधुसूदन मुत्याल, एडवोकेट बालाजी वाघ, अजिंक्य जलेवार, सिद्धिविनायक मुळे, पवन भुरेवाल ,अर्जुन डहाळे ,सौरभ जोशी ,रुपेश खरे, चेतन वर्मा, शिवराज नारियलवाले, आदींची उपस्थिती होती.
-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172