जालना- जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारानुसार उद्या मंगळवार दिनांक 4 रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे .या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज पारित केले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की ,जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक चार रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष व संघटना यांच्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरले होते .त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण ,धनगर आरक्षण ,विविध राजकीय पक्षांची भूमिका ,विचारात घेता तसेच इतर समाजांची भूमिका लक्षात घेता निवडणुकांमध्ये उमेदवारांचा जय पराजय, यावरून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे तसेच नैराश्याच्या कारणावरून मतभेद होऊ शकतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या अंगीभुत अधिकाराचा वापर करून फौजदारी सहीचा 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी जालना जिल्ह्यात ही संचारबंदी मंगळवार दिनांक 4 रोजी पहाटे सहा वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. तसेच ही संचारबंदी दुकाने ,आस्थापना यांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके, सोबत बाळगता येणार नाही परंतु या संचार बंदी मधून शासकीय -निमशासकीय कार्यालय ,दूध वितरण, पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या अस्थापना, रेल्वे व्यवस्था, दवाखाने, वैद्यकीय केंद्र, प्रसार माध्यमे- मीडिया शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय यांना वगळण्यात आले आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारचे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी विरोध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मनोज जरांगे पाटील हे आज पासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणास बसणार होते, आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जरांग यांची भेट घेऊन परवानगी नसल्याचे कळविले आहे. या संदर्भात ईडीटीव्ही ने सविस्तर बातमी दुपारी तीन वाजता प्रसारित केली आहे. ही बातमी प्रसारित होताच उलट सुलट प्रतिक्रिया जिल्ह्यामध्ये उमटायला लागल्या आहेत . आणि आत्तापर्यंत सर्वच सर्वच प्रसार माध्यमांनी अंतरवाली सराटी येथील आरोग्य प्रत्यारोपांना प्रसिद्धी दिली आहे. पार्श्वभूमीवर देखील ही संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची शक्यता आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172