जालना -नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या लब्धी कुमारी गुलेच्छा या जैन धर्माची दीक्षा घेत आहेत .गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस या दीक्षा घेण्याचा विधी सुरू आहे. दीक्षा घेतल्यानंतर साध्वीला घरदार, नातेवाईक, सर्व सुख सुविधांचा त्याग करावा लागतो. पांढरे वस्त्र परिधान करून साध्वी सारखे जीवन जगावे लागते. हे जीवन जगताना केश लोचन (डोक्यावरील संपूर्ण केस एका विशिष्ट पद्धतीने उपटून काढणे) आयुष्यभर पायी चालणे आणि तिसरं म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर आयुष्यभर स्नान न करणे हे तीन व्रत अंगीकारावे लागतात .या व्रताचे काय महत्त्व आहे हे सविस्तर सांगितले आहे पंन्यासप्रवर पदम्बबोधिविजजी महाराज यांनी.
सौभागग्यवर्धक श्री चंद्रप्रभु जैन मंदिर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लोहनेर येथील मुमुक्षु लब्धि संजय गुलेछा या 2 फेब्रुवारीला गुरु गणेश तपोधाम येथे होणाऱ्या जैन भगवती दीक्षा घेणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती देताना त्यांनी जैन समाजातील विविध रूढी परंपरांविषयी सविस्तर माहिती दिली .
दीक्षा देण्यासाठी परम पूज्य आचार्य श्रीमद विजय वरबोधिसूरिश्वरजी महाराज साहेब हे मुंबई येथून जालना येथे आले आहेत.
पत्रकार परिषद मधे चंद्र प्रभु जैन मन्दिर ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक बिनायिकीया, सचिव प्रमोद देसरडा, उपाध्यक्ष भावेश मेहता, विश्वस्त हिरेन सियाल, अतुल जैन, दीपक मोदी, आनंदराज सिंघवी, आशीष शाह, कुशल देसरडा, संतोष कात्रेला यांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172