जालना- राष्ट्रमातेच्या नावाने चालू असलेल्या शिक्षण संस्थेत आपल्याच समाज बांधवांची पिळवणूक करून स्वयंघोषित नेता म्हणून घेणाऱ्या जालना जिल्ह्यातील एका कार्यकर्त्यामुळे इतर नेत्यांनी एल्गार सभेला जाणे टाळले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलने आणि सभांना तोंड देऊन आपल्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी अंबड येथे “ओबीसी बचाव एल्गार सभा” आयोजित केली होते .या सभेला प्रमुख वक्ते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य काही नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. खरंतर जालना जिल्ह्यापासून या एल्गार सभांना सुरुवात झाली, त्यामुळे इतर जिल्हांप्रमाणेच जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी नेते ज्यांनी आत्तापर्यंत ओबीसी म्हणून पदे उपभोगली आहेत हे तिथे असणे अपेक्षित होते .परंतु केवळ एका स्वयंघोषित नेत्याच्या चमकोगिरीपनामुळे इतर नेत्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली असावी अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. राष्ट्रमातेच्या नावाने सुरू असलेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा जागर न करता शिक्षणाचा… करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वतःच्याच शिक्षण संस्थेमध्ये अनेकांची पिळवणूक केली जात आहे.या याविषयी न्यायालयात देखील प्रकरणे आहेत. जो जो स्वयंघोषित नेता स्वतःच्याच कर्मचाऱ्यांची पिळवणूक करतो, तो इतरांना काय न्याय देईल असा प्रश्न या ओबीसी नेत्यांनी उपस्थित केल्याचे समजते ?त्यामुळे तळागाळात काम करणाऱ्या या ओबीसी नेत्यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले. अशीही चर्चा आता रंगायला लागली आहे.
सामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कधीही न प्रयत्न करता जिथे प्रसिद्धी मिळेल अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी या स्वयंघोषित नेत्याचा वरिष्ठ नेत्यांच्या पुढे पुढे करण्यातच धन्यता मानतो त्यामुळे सामान्य नेते आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती असेल तर शक्यतो कार्यक्रमाला जाणे टाळतात असेही बोलले जात आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172