जालना- राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे ,समान काम समान वेतन द्यावे या आणि अन्य मागण्या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज गांधी चमन येथून जिल्हा परिषदेपर्यंत फेरीही काढण्यात आली.
विविध टप्प्यांमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. आजही हे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणूनच ओळखल्या जात आहेत .दहा -दहा वर्ष होऊनही त्यांना सेवेत कायम केले जात नाही. त्यामुळे सेवेत कायम करावे आणि ज्याप्रमाणे इतर कर्मचाऱ्यांना वेतन आहे तसेच समान काम समान वेतन द्यावे अशी मागणीही या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आज जालना जिल्ह्यातील सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे .त्यामुळे आरोग्य यंत्रणा विशेष करून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असताना देखील काहीच तोडगा निघाला नाही.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172