जालना-26 11 ही तारीख म्हटले की अंगावर काटा येतो कारण याच दिवशी पाकिस्तानातील 10 दहशतवाद्यांनी मुंबई येथे हल्ला केला होता यामध्ये सुमारे 800 नागरिक गंभीर जखमी झाले होते, त्यामध्ये 34 परदेशी पाहुण्यांचाही समावेश होता तर 14 पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले होते, तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी देखील गंभीर जखमी झाले होते, अशा या मुंबईच्या हल्ल्याचा थरार हा शब्दात सांगण्यासारखा नाही, अशा भावना पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी व्यक्त केल्या आहेत. हा हल्ला झाला त्यावेळी प्रशांत महाजन हे मुंबई शहर पोलीस दलातच कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी या हल्ल्याच्या पश्चात जे मदत कार्य आणि पोलीस कारवाया झाल्या त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी 26/ 11 या दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर Edtv News ने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये श्री. महाजन बोलत होते.
हल्ला कसा झाला? त्यानंतर काय परिस्थिती उद्भवली? आणि कशी हाताळली तो अनुभव शब्दात सांगता येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही. या हल्ल्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा भासला होता. तशीच परिस्थिती तीन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या कोविड महामारीमुळे देखील निर्माण झाली होती. या दोन्ही परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी म्हणून रक्त संकलन करण्याचे ठरवले होते. याच निमित्ताने शहिदांच्या बलिदानालाही उजाळा मिळतो. त्यामुळे 26/ 11 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येते. यावर्षीचे हे चौथे वर्ष असल्याचेही ते म्हणाले .
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172