कोल्हापूर – लग्न आणि स्वागत समारंभाला सुरुवात झाली आहे .या सुरुवातीसोबतच भामट्यांचा ऊर्जित काळही आला आहे. त्यामुळे लग्नात किंवा स्वागत समारंभामध्ये अनोळखी चेहऱ्यांची विचारपूस करायचे टाळू नका. अन्यथा तुमचे दागिने लंपास झालेच समजा.

कोल्हापूर येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी मुस्कान लॉन मध्ये एका लग्नाचा स्वागत समारंभ होता .निमंत्रित पाहुण्यांप्रमाणेच सूटबूट घालून आलेल्या चार भामट्यांनी  एका महिलेचे 15 लाख रुपयांचे तीस तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे हे चारही भामटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसत आहेत सूटबूट घालून एक दुसऱ्याच्या संपर्कात राहिले आणि एक महिला वधू-वरांसोबत छायाचित्र काढण्यासाठी स्टेजवर गेले असता खुर्चीवर ठेवलेली पर्स या भामट्यांनी पळविली आहे त्यामुळे अनोळखी चेहऱ्यांना लग्नात चौकशी करायचे विसरू नका.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version