जालना- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल  अपशब्द वापरले .याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना, हिंदू समाज बांधव आणि हिंदू संघटनांच्या वतीने आव्हाड यांच्या पुतळ्याला चपलाने मारहाण करून तो जाळण्यात आला.

आमदार आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, त्यांनी मटण खाल्ल्यामुळे आम्हीही मटण खातो असे म्हणून प्रभू श्रीराम  यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते .याचा पडसाद राज्यभर उमटला आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये विविध सामाजिक संघटना, हिंदू संघटनांच्या वतीने आव्हाड यांच्या पुतळ्याला चपला बुटाने मारहाण करत तो जाळून टाकण्यात आला. त्यानंतर बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version