जालना- महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद जालना मार्फत सुरू असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पांतर्गत 456 पदांची भरती करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्रीमती कोमल कोरे -चाटे यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्र काढले आहे.

जालना जिल्ह्यामध्ये एकूण बारा ठिकाणी ही पदे रिक्त आहेत .त्यामध्ये अंगणवाडी सेविकांची 114 तर अंगणवाडी मदतनीसांची 342 पदे भरल्या जाणार आहेत. दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित पदासाठी पात्रता आणि अर्ज हे त्या -त्या तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध असल्याचेही श्रीमती कोमल कोरे यांनी सांगितले आहे.या आहेत रिक्त ठिकाणच्या जागा

आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version