जालना-” आमच्या पक्षाचे आम्ही बघू,तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा” अशा स्पष्ट शब्दात सडेतोड उत्तर दिलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना. मागील आठवड्यामध्ये जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये धुळे येथे विश्रामगृहात सापडलेल्या रोख रकमे संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना का आंदोलन करत नाही? ते झोपले आहेत का? असा प्रश्न केला होता. या प्रश्नाचे उत्तर आज श्री. दानवे यांनी दिले आहे. दरम्यान जालिंदर सुपेकर हे भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी आहेत ते काही आत्ता हगवणे प्रकरणामुळे समोर आलेले नाहीत तर त्यांच्यावर यापूर्वी देखील अनेक वेळा असे आरोप झाले आहेत शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ही श्री. दानवे यांनी यावेळी केली.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला होता या आश्वासनांची पूर्तता अद्याप पर्यंत झालेली नाही. त्यामुळे या सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने” क्या हुआ तेरा वादा हे “अभियान सुरू करण्यात आले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून आज जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बैठका आहेत. त्याचाच एक भाग आज सकाळी आठ वाजता पहिल्या टप्प्यात बदनापूर तालुक्यात झाला. बदनापूर तालुक्याचे शिवसेनाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर तालुक्यातील गेवराई येथे आज अभियानासाठी श्री. दानवे हे आले होते. यावेळी गावातील बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते. सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण झाली आणि किती बाकी आहेत ?याचा आढावा दानवे यांनी घेतला आणि अशी चर्चा केली. यावेळी तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण ,भगवान कदम ,भानुदास घुगे नाना यांची उपस्थिती होती.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
दिलीप पोहनेरकर –९४२२२१९१७२