जालना- ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उंच भरारी घेणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय आजी-माजी अधिकारी कर्मचाऱ्यांचा रेवगाव(ता.जालना) च्या ग्रामस्थांचा सत्कार सोहळा रविवारी पार पडला.
लखरं तर सहा-सात हजार लोकवस्तीचे हे गाव. मात्र येथील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली तर निश्चितच विचार करायला लावणारी आहे .प्रत्येक घरांमध्ये एक तरी शासकीय कर्मचारी आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे या गावात सात सैनिक आहेत, पाच राज्य राखीव पोलिस दलात जवान आहेत ,सुमारे वीस पोलिस आणि पाच होमगार्ड आहेत .अशा या रक्षण क्षेत्रात हे कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षणात देखील हे गाव पाठीमागे नाही. मोठ्या महाविद्यालयांच्या प्राचार्या पासून ते अंगणवाडी सेविकेपर्यंत या गावातील ग्रामस्थांनी मजल मारली आहे.
आजच्या कार्यक्रमाला हरिभक्त परायण कीर्तनकार महाराजांसह पोलीस निरीक्षक देविदास शेळके, मारुती खेडकर ,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
* हे आहे संचालक मंडळ* अध्यक्ष- रंगनाथ गोल्डे, उपाध्यक्ष -एकनाथ गोल्डे, सचिव- दामोदर गोल्डे, कोषाध्यक्ष- गंगाधर गोल्डे तर सदस्य म्हणून भीमराव गोल्डे, नारायण गोल्डे, सौ.मीरा विश्वनाथ गोल्डे, राहुल गोल्डे ,सौ.कांताबाई काकडे, यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बापूराव गोल्डे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रेमानंद महाराज मंदिर प्रतिष्ठानचे पदाधिकारी ह. भ. प. विष्णु महाराज बारड यांनी केले.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
९४२२२१९१७२