शेतकऱ्यांना मदत करण्याचे टाळण्यासाठीच सरकार ई पीक पाहणी चे नाटक करीत आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी च्या माध्यमातून शेतात जाऊन फोटो काढणे आणि ती माहिती भरणे बंधनकारक करीत आहे, मात्र सद्यपरिस्थितीत शेतात जाणे मुश्कील झाले आहे. आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना इंग्रजी लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे काही ना काही बहाणा करून शेतकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवण्याचे नाटक हे राज्य सरकार करीत आहे .असा आरोप माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

त्याच सोबत बागायती जमिनीला एक लाख रुपये हेक्टरी तर कोरडवाहू जमिनीला 50 हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.

-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version