ग्रामसेविकेच्या चौकशीसाठी जि.प.समोर उपोषण;पण गावात काय घडलं?

जालना- मंठा तालुक्यातील सावरगाव वायाळ येथील ग्रामसेविकेची चौकशी करावी या मागणीसाठी याच गावचे ग्रामपंचायत सदस्य सोपान पंढरीनाथ वायाळ आणि अन्य काहीजण जिल्हा परिषदेसमोर दिनांक 22 पासून उपोषणाला बसले आहेत. ग्रामसेविका नियमित सज्जावर येत नाहीत, गावातील राजकीय वातावरण दूषित करीत आहेत, पाणीपट्टी वसुलीची रक्कम ग्रामपंचायतच्या बँकेच्या खात्यात जमा न करता स्वतःसाठी वापरून अपहार केला आहे ,गावातील समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली असता त्या अरेरावीची भाषा करतात आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देतात .अशा प्रकारची तक्रार सोपान वायाळ यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती आणि त्या अनुषंगाने दिनांक 22 एप्रिल पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत.
नेहमीप्रमाणे भ्रष्टाचारांच्या बातम्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या बातम्या या Esto News (www.edtvjalna.com)कधीही एकतर्फी छापत नाही .त्यामुळे या गंभीर आरोपांची सत्य परिस्थिती पाहण्यासाठी ईडी टीव्ही न्यूज चा कॅमेरा आज गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सावरगाव वायाळ येथे पोहोचला .यावेळी तिथे सभा सुरू होती ही सभा झाल्यानंतर ग्रामसेविकेवर असलेल्या आरोपांसंदर्भात सर्वांसमक्षच गावकऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी प्रथमदर्शनी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत ने पैसे वसूल केल्याचे सांगितले. परंतु कोणी घेतले? कोणाच्या सांगण्यावरून घेतले ?पावती दिली का?याची चौकशी केल्यानंतर मात्र सर्वांनीच हात झटकले आणि यापूर्वी असलेल्या ग्रामसेवक व अब्दुल मुनीर शेख यांनी फेर आकारणीसाठी गावकऱ्यांकडून 2 हजार, 3हजार अशा प्रकारे वेगवेगळ्या रकमा हडप केल्या आहेत त्या प्रकरणाशी विद्यमान ग्रामसेविका आरती वडगावकर यांचा संबंध नसल्याची त्यांनी सांगितले .दरम्यान हजार बाराशे लोक वस्तीच्या असलेल्या या गावत सात ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यापैकी आजच्या या सभेला पाच सदस्य उपस्थित होते .तसेच गावातील सुमारे 100 गावकरी देखील या सभेला उपस्थित होते.
दरम्यान उपोषण कर्ते सोपान वायाळ यांच्या मागणीनुसार ग्रामसेविका आरती वडगावकर यांची बदली करावी अशी त्यांची मागणी आहे. या बदली संदर्भात श्रीमती वडगावकर म्हणाल्या, कि मला इथे हजर होऊन सहाच महिने झाले आहेत. त्यापैकी एक महिना मी रजेवर होते आणि उर्वरित पाच महिन्यांमध्ये माझी बदली करावी अशी विनंती सहा वेळा मी पत्राद्वारे वरिष्ठांकडे केलेली आहे. राहिला विषय ग्रामपंचायतच्या पैशाचा तर हे सर्व पैसे दुसऱ्या बँकेमध्ये खाते उघडून भरलेले आहेत.
दरम्यान सोपान वायाळ यांच्या आरोपात तथ्य आहे किंवा नाही हे सरपंचांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सरपंच श्रीमती वायाळ यांनी सांगितले की ग्रामसेविकेविषयी आमची कुठलीही तक्रार नाही. उलट याच ग्रामसेविका आम्हाला पाहिजे आहेत .त्यासोबत सोपान वायाळ हे विनाकारण गावकऱ्यांना त्रास देत असून खोट्या तक्रारी करत आहेत. त्यामुळे आरती वडगावकर यांची जरी बदली करून घेण्याची इच्छा असली तरी आम्ही त्यांची बदली होऊ देणार नाहीत. कारण यापूर्वी चार ग्रामसेवक आले आणि गेले परंतु गावातील कुठलीच कामे झाली नाहीत.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172