जालना- मोटरसायकलच्या किरकोळ अपघातावरून जालना शहरातील सतकर कॉम्प्लेक्स परिसरामध्ये दोन समाजामध्ये तलवारीने मारहाण करून दगडफेकी झाली होती, यानंतर या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .दरम्यान पोलिसांनी वेळीच धाव घेऊन प्रकरण आटोक्यात आणले .या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी सरकारच्या वतीने एक तक्रार दिली असून दोन्ही समाजाच्या परस्परविरोधी तक्रारीवरून कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणातील एकूण आठ आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लौकिक धर्मेंद्र जांगडे वय, अठरा वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 12 रोजी आठ वाजेच्या सुमारास मी माझा भाऊ आणि दुकानातील कामगार असे दुकानात काम करत असताना दुकानासमोर दोन मोटरसायकलचा अपघात झाला. हा अपघात करणारा एक मुस्लिम समाजाचा होता  त्यांना आमच्या दुकानासमोर भांडण करू नका ,धंद्याची वेळ आहे असे म्हणालो असता  त्याने असभ्य भाषेत शिवीगाळ सुरू केली आणि अंगावर धावून येऊन चापट, बुक्क्याने मारहाण केली ते सोडवण्यासाठी माझे भाऊ आणि नोकर आल्यानंतर तेथे आणखी परत 60-70 लोकांना बोलावून माझ्या दुकानावर दगडफेक केली यामध्ये माझ्या डोक्याला जखम झाली आहे. दगडफेक आणि मारहाण करणाऱ्या लोकांना मी ओळखत नाही मात्र पाहिल्यानंतर त्यांना ओळखू शकतो. या फिर्यादीवरून पोलिसांनी मुस्लिम समाजाच्या अनोळखी इसमान विरुद्ध गुन्हा 336 323 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या तक्रारीमध्ये ताहेर सत्तार खां पठाण वय 34 वर्ष ,यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, रात्री आठ वाजेच्या सुमारास ज्योतिप्रिया कॉम्प्लेक्स नूतन वसाहत येथे मी आणि माझे काही मित्र गप्पा मारत बसलो असताना बडे खासिम खान यांनी मला फोनवर इम्रान खा मण्यार त्यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याचे सांगितले आणि लोक भांडत आहेत असेसांगून तू लवकर ये असे म्हणाले. त्यामुळे मी जांगडे यांच्या पेट्रोल पंपा समोर गेलो असता तेथे इमरान मण्यार यांच्यासोबत दुसरे काही लोक मोटरसायकलच्या अपघातावरून भांडण करताना दिसले. त्यावेळी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केले असता त्या ठिकाणी धर्मेंद्र जांगडे, तिलकचंद जांगडे, धीरज जांगडे, आणि अन्य काही लोक आमच्या जवळ आले आणि जातीवाचक शिवीगाळ करू लागले. त्यासोबत त्यांच्यापैकी एकाने पाठीमागून येऊन तलवारीने माझ्या हातावर वार केला. यामध्ये मी जखमी झालो आहे या तक्रारीवरून कदम जालना पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचे तपासिका अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भगवान नागरे यांनी आठ आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर केले केले . त्यावेळी दोन्ही समाजातील लोक रस्त्यावर दगडफेक आणि तलवारीने मारहाण करत असल्यामुळे समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत होते ,त्यांच्या या मारहाणीमुळे सामान्य माणसांना दिवाळी सारख्या सणांमध्ये विनाकारण त्रास सहन करावा लागला आणि भीतीचे वातावरण होते. या मारहाणी मध्ये त्यांनी वापरलेले शस्त्र हे जप्त करायचे आहेत त्यामुळे या आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली.

पोलिसांची ही मागणी न्यायमूर्ती श्रीमती एन. ए. वानखेडे यांनी ग्राह्य धरून पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे .रात्री झालेल्या या मारहाण प्रकरणांमध्ये एकूण तीन गुन्ह्यांमध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आले आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version