जालना- शिक्षण क्षेत्र ही गढूळ झाले आहे, त्याहीपेक्षा राजकारण अति गढूळ झाले आहे असे मत मच्छोदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. पार्थ सैनिकी शाळेच्या विसाव्या स्नेहसंमेलन प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजी नगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर रेंगे, मत्स्योदारी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड प्राचार्य मोहन नेहेरे मत्स्योदारी शाळा अंबड चे मुख्याध्यापक श्री. देव अजिंक्य टोपे यांची उपस्थिती होती.
पार्थ सैनिकी शाळा अंतर्गत वर्षभर झालेल्या विविध उपक्रमांचे आणि स्नेहसंमेलनातील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन कार्यक्रम करत कवायती ही सादर केल्या. दरम्यान पुढे बोलताना श्री. टोपे म्हणाले की पा पार्थ सैनिकी शाळेमध्ये आर्थिक चंचन आहे परंतु कोणत्याही सुख सुविधा कमी नाहीत, याचे कारण आम्ही गुणवत्ता राखतो .इतर संस्थेमध्ये उमेदवाराला नोकरी देण्यासाठी त्याच्याकडून 40 ते 70 लाख रुपये घेतले जातात परंतु आम्ही उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर त्याला चहापान देऊन नियुक्तिपत्र देतो. दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्र हे गढूळ होत चालले आहे त्यामुळे गुणवत्ता ढासळत आहे ही गुणवत्ता जोपासण्याचे काम मत्स्योदारी शिक्षण संस्था करत आहे .शिक्षण संस्थेमध्ये ढासळत असलेल्या गुणवत्तेपेक्षाही गढूळ वातावरण हे राजकारणात झालं असल्याचं मतही आमदार टोपे यांनी व्यक्त केलं.
यावेळी प्रमुख पाहुणे रामेश्वर रेंगे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केलं .वर्षभराचा शाळेचा लेखाजोखा प्राचार्य मोहन नेहरे यांनी सादर केला.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172