जालना- लोकसभेचे पडघम वाजायला लागले आहेत आणि जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे. यातूनच आचारसंहितेचा बागुलबुवा देखील पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे संदर्भात आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक घरांवर वेगवेगळ्या रंगाचे, आणि वेगवेगळ्या मजकूर लिहिलेले ध्वज दिसत आहेत. हे ध्वज काढण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे .परंतु असे ध्वज काढल्यामुळे अनेकांच्या भावना दुखायलाही सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी विरोध ही होत आहे . आचारसंहितेमध्ये यासंदर्भात नेमक्या काय सूचना आहेत, त्याचाच संभ्रम अधिकाऱ्यांमध्ये असल्याचे आज दिसून आले. जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांनी आज पत्रकार परिषदेत घरांवरील वेगवेगळ्या रंगाच्या ध्वजासंदर्भात तशा सूचना नाहीत परंतु निवडणूक आयोगाकडून या संदर्भात मार्गदर्शन मागू अशी माहिती दिली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172