जालना- सोमवार दिनांक 17 रोजी बकरी ईद हा सण आहे या सणाच्या दिवशी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्या जाते. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा)कायदा 1995 नुसार जनावरांची कत्तल करण्यापूर्वी त्यांची तपासणी आवश्यक आहे. ही तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक 20 पर्यंत या अधिकाऱ्यांच्या सर्व रजाही रद्द करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कत्तल होणाऱ्या जनावरांची तपासणी करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जाफराबाद ,चंदनझीरा ,नवीन जालना मंगळ बाजार,जुना जालना, गांधीनगर ,गोलापांगरी, नेर, रामनगर, वाकुळणी, जामखेड ,चिखली, वडीगोद्री, घनसावंगी, तीर्थपुरी, माहोरा जानेफळ, आष्टी ,सृष्टी वाहेगाव, अंबड ,हसनाबाद, जवखेडा, बदनापूर, उसवद, जयपूर ,मंठा, भोकरदन ,वाटुर ,खासगाव ,सातोना, परतुर, कुंभार पिंपळगाव ,सेवली, भीमनगर, मूर्तीवेस, नळणी ,अशी ही ठिकाणे आहेत. काही ठिकाणी फिरते पशुचिकित्सालयात हे प्रमाणपत्र मिळणार आहे तर बहुतांशी प्रमाणपत्र हे पशुविकास अधिकारी यांच्याकडे देखील उपलब्ध होणार आहे. कत्तल करण्यात आलेल्या जनावरांच्या सविस्तर नोंदी रोजच्या रोज वरिष्ठांना कळविण्यात याव्यात .अशा सूचनाही जालना जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी संयुक्तरीत्या दिल्या आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172