जालना- अंबड तालुक्यातील ताड हादगाव येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आहे .या तलावातून सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या जागेवर गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधले आहेत. आणि प्लॉटिंग करून भूखंड ही विक्री केले आहेत. पर्यायाने या सांडव्यातून वाहत जाणारे पाणी हे दुसऱ्या मार्गाने वाहत जात असल्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या घरामध्ये आणि जमिनीमध्ये हे पाणी जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवावे आणि पाण्याला वाट काढून द्यावी या मागणीसाठी गावातीलच कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्र हे 80 वर्षाचे आजोबा जिल्हा परिषदेसमोर दिनांक 13 पासून उपोषणाला बसले आहेत.

यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला जून 2022 पासून अनेक वेळा विनंती अर्ज तक्रारी प्रत्यक्ष भेटी देऊनही काहीच उपयोग झाला नाही अधिकारी गावात येतात आणि प्लॉटिंग वाल्यांची हात मिळवणी करून परत फिरतात असा आरोपही या आजोबांनी केला आहे दरम्यान जोपर्यंत या अतिक्रमण धारकांवर कारवाई होत नाही आणि सांडव्याचे पाणी नियोजित जागेतून काढून दिला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धारही या आजोबांनी केला आहे त्याच सोबत आपण वारंवार करीत असलेल्या तक्रारी आणि उपोषण यामुळे अतिक्रमण केलेल्या लोकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही ठामपणे ते सांगत आहेत आणि जीवाचे काही बरे वाईट झाले तर लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी याला जबाबदार असतील असेही ते म्हणाले.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version