जालना- शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील पीडित बालकांना योग्य न्याय मिळावा म्हणून शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला बालकल्याण समिती असते. या बालकल्याण समितीला न्यायाधीशांचा दर्जा असतो. परंतु हा दर्जा केवळ कागदोपत्रीच आहे की काय? अशी शंका या विभागाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता यायला लागली आहे. या समितीला न्यायाधीशांचा दर्जा असतो. आणि त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. अशा असताना देखील न्यायासाठी या समितीचे सदस्य आयुक्तांचे दार ठोठवत होते, परंतु वेळीच न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी शेवटी न्यायाधीश असलेल्या अध्यक्षांवरच गुन्हा दाखल केला.

जालना जिल्ह्यामध्ये पाच सदस्यांची ही समिती आहे. त्यामध्ये तीन महिला सदस्य आहेत या समितीचे अध्यक्ष म्हणून एकनाथ राऊत हे काम पाहतात. दरम्यान या तीनही महिला सदस्यांनी, एकनाथ राऊत हे महिला सदस्यांना लज्जास्पद ,अपमानास्पद ,वाटेल अशी वागणूक देतात आणि गैरवर्तन करतात अशी गंभीर तक्रार महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांकडे दिनांक १ सप्टेंबर रोजी केली होती. जिल्हाधिकारी आणि विशाखा समितीला देखील भेटून हा सर्व प्रकार सांगितला होता.( शासकीय महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशाखा समितीची स्थापना आहे) परंतु विशाखा समितीच्या अध्यक्षा अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी हे प्रकरण आपल्या कक्षेच्या बाहेर असल्याचे सांगून त्या संदर्भात पत्र देऊन निर्णय कळवला होता. तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपला अभिप्राय आयुक्तांना कळवलेला होता .असे असताना देखील दिनांक 20 सप्टेंबर पर्यंत या विभागाने काहीच हालचाली केल्या नाहीत आणि महिला सदस्यांना याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी दिनांक 20 सप्टेंबरला पोलीस ठाण्यात अध्यक्ष एकनाथ राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. आणि कार्यालयातील केलेल्या कामकाजाच्या संचिका तसेच इतर साहित्य हलवल्या जाऊ नये म्हणून दिनांक 23 रोजी कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरला पंचा समक्ष सील लावले होते. हे सील दिनांक 30 रोजी समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांनी कार्यालयात येऊन तोडले. तोडलेल्या सिलासंदर्भात तीन सदस्य एक शिक्षक आणि एक समुपदेशक यांच्या उपस्थितीत पंचनामाही करण्यात आला. त्यानंतर देखील आयुक्तांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. आजही या न्यायाधीश असलेल्या महिला भीतीच्या वातावरणाखाली काम करत आहेत. तब्बल एक महिन्यानंतर म्हणजेच दिनांक 30 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांनी जालनाच्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केले आहे .या समितीचे अध्यक्ष म्हणून परभणीचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांची तर सदस्य म्हणून जालना जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती कोमल कोरे, नागरी प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी एन. डी. वामन, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये चार सदस्य असल्यामुळे जर दोन सदस्यांची मते सारखीच आली तर पुन्हा काय करायचे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version