जालना- जालन्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष सुनील(बापू) आर्दड हे मूळचे घनसावंगी तालुक्यातील रहिवाशी . मध्यंतरीचा काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपामध्ये पदाधिकारी आहेत.  परंतु गेल्या काही दिवसांपासून घनसावंगी येथे सतीश घाटगे यांनी समृद्धी साखर कारखाना सुरू केला. त्यामुळे मतदार संघाचे बरेच राजकारण बदलले आहे .दीड वर्षांपासून सतीश घाटगे यांनी केलेली कामे आणि त्या बदल्यात पक्षाने दिलेले नेतृत्व यामुळे सुनील आर्दड आणि घाडगे पाटलांमध्ये समन्वय नव्हता .मागील वर्षी झालेल्या जाहीर सभेमध्ये जनता जनार्दनाच्या समोरच हा वाद उफाळूनही आला होता. त्यामुळे आता सुनील आर्दड यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविता जालना विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून उमेदवारी लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र अजूनही ते या निर्णयावर ठाम नाहीत.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version