जालना- “दादा माझी शेवटची इच्छा पूर्ण करा, मी यानंतर काही मागणार नाही” असं लोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सकाळी लावलं. निमित्त होतं माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी बांधलेल्या भव्य राष्ट्रवादी काँग्रेस भावनांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. निवडणुका झाल्या परंतु राष्ट्रवादीला कुठेही स्थान मिळाले नाही त्यामुळे अरविंद चव्हाण यांच्या रूपाने जालना जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यावं !अशी मागणी युतीमधील इतर नेत्यांनीही केली आहे आणि या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी अरविंदराव चव्हाण यांनी या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित दादांना बोलावलं होतं.
आज दिनांक 20 रोजी सकाळी दहा वाजता या कार्यालयाचे उद्घाटन झालं आणि अरविंद अण्णांनी शेर शायरी मध्ये अजित पवारांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला .दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील तशाच पद्धतीने मिश्किल स्वरूपात अरविंद अण्णांना वेळ आले की मिळेल तोपर्यंत काम करा असा सल्ला दिला आणि ईव्हीएम संदर्भात विरोधी पक्षावर टीका देखील केली याच दरम्यान अति उत्साहाने बोलत असलेल्या विक्रम काळे यांच्यावर दादांनी प्रेमाने हात देखील फिरवला हे सर्व पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172