जालना- पहेलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विदेश मंत्रालयाने(Ministry of External Affaires,Mea) भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानचा व्हिसा (visa)धारकांना 48 तासात भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जालना शहरात देखील पाच हिंदू, पाकिस्तानी नागरिकांकडे व्हिसा आहे. परंतु त्यांना भारत देश सोडण्याची गरज नसल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

जालना शहरांमध्ये कपडा व्यवसाय करणाऱ्या दोन कुटुंबांकडे पाकिस्तानचा व्हिसा आहे त्यामध्ये 2007 ते ऑगस्ट 2025 पर्यंतचा विसा असलेल्या एका नागरिकाचा समावेश आहे. तर दुसऱ्या परिवारातील चार सदस्यांकडे 2008 ते 22 डिसेंबर 2025 पर्यंतचा visa आहे दरम्यान. या संदर्भात विदेश मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की हिंदू पाकिस्तानी नागरिकांना, आधीच जारी केलेल्या दीर्घकालीन व्हिसासाठी हे लागू होत नाही. त्यामुळे आता जालना शहरात वास्तव्यास असलेल्या या पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याची आवश्यकता नाही.

व्हिसा चे प्रकार- विसा म्हणजे एका देशाच्या सरकारने दिलेला अधिकृत दस्तावेज किंवा शिक्का जो एखाद्या व्यक्तीला विशिष्ट देशात प्रवेश, राहण्याची किंवा सोडण्याची परवानगी देतो. ज्यामुळे परदेशात कायदेशीररित्या प्रवेश करता येतो. या व्हिसाचे पाच प्रकार आहेत.1)Tourist visa 2)Work visa 3)student visa 4)family visa 5)business Visa.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version